Posts

Showing posts from October, 2020

*सब देखा लेकिन भाडळे नही देखा*

Image
        *सब देखा लेकिन भाडळे नही देखा*                       ------------------------------- -------------------                                      **प्रा.प्रकाश नाईक*,सरुडता.शाहूवाडी                                                      ८३७८८४९५९५                    ------------- ----    ---------------------------------                                       एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिशांनी जवळपास संपूर्ण भारतावर कब्जा घेतला होता. भारतातली बहुतांश संस्थाने आणि राज्ये त्यांनी जिंकली होती. ...

मजी आमी कुठलं...पाटंवाडीचं??

Image
*मजी आमी कुठलं...,पाटंवाडीचं?                            * ---------------------------------                                       कोल्हापूरच्या माणसांनी मराठी भाषेला एकाहून एक असे खास शब्द बहाल केलेले  आहेत. कोल्हापूरच्या भाषेचा लहेजा खरंच वेगळाच असतो. इथली माणसं जशी मोकळी ढाकळी तशीच ती प्रेमळ आणि रांगडी.   जे काळजात असतं   ते बोलणारी. कोल्हापूरच्या संस्कृतीनं   मराठी भाषेच्या समृद्धीत भर टाकली आहे.  मराठी भाषेचे वैभव वाढविण्यामध्ये कोल्हापूर परिसराने मोठे योगदान दिले आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूर परिसरामध्ये एक प्रश्नार्थक वाक्य  नेहमी वापरले जाते आणि त्या  वाक्याची चर्चा सगळीकडे आहे. म्हणजे जेव्हा आपली फिरकी घेतली जाते किंवा आपल्याला फसवलं जातं किंवा गंडवलं जातं, तेव्हा ती व्यक्ती असे म्हणते," मजी आम्ही कुठलं ?फुलेवाडीचं?" म्हणजे...

बोरपाळं हाटेल

*बोरपाळं हाटेल*      कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूर पासून साधारण वीस कि.मी.अंतरावर बोरपाडळे हाॕटेल नावाचा थांबा आहे.खरं तर बोरपाडळे गाव त्या थांब्यापासून दोन कि.मी.आत आहे.इथेच महार्गावरुन वारणानगरकडे जाण्यास फाटा फुटतो.हा तिठा बोरपाडळे हाॕटेल या नावाने प्रसिद्ध पावलेला आहे.या ठिकाणी कोणते हाॕटेल आहे की, ज्या नावाने हे ठिकाण ओळखले जाते,याबाबत उत्सुकता होती.माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर ते हाॕटेल माझा  मित्र अमर पाटील याच्या आजोबांनी १९४५ च्या सुमारास सुरु केल्याची माहिती मिळाली.       बोरपाडळे या गावाची उच्चारसुलभता म्हणून बोरपाळं असाच उच्चार आमच्या परिसरात केला जातो.शाहूवाडी,पन्हाळा तालुक्यात *बोरपाळं हाटेल* या नावानं हे ठिकाण ओळखले जाते.या हाॕटेलचा इतिहास म्हणजे ग्रामीण भागातील एका माणसाच्या उद्यमशीलतेतून आकाराला आलेला आहे.   *शंकर दत्तात्रय पाटील* हे मुळचे शाहूवाडी तालुक्यातले तळपवाडी या गावचे .बोरपाडळे या गावात ते घरजावई म्हणून आले.स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाता येणारा हा एकमेव मार्ग होता.या तिठ्यावरुन...

शब्द

शब्द फुटत नाहीएत.....!भयग्रस्त भवताल बघून.. काळजात दाटून आलेल्या  भावनांच्या आविष्कारासाठी धडपडतायत शब्द...!वाट बघतायत सगळे माझ्या एका शब्दाची! अन् मी मात्र तसाच.....प्रतीक्षेत शब्दाच्या!धीर सोडलेला नाही मी....शब्द येईल....!नवे वर्तमान घेऊन!!! (प्रा.प्रकाश नाईक)