Posts

Showing posts from May, 2026

मातंग समाजाच्या प्रबोधन चळवळीतील बिनीचा शिलेदार - शंकरराव भोरे

 ज्येष्ठ साहित्यिक, विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि मातंग समाजाच्या चळवळीतील पहिल्या पिढीचे बिनीचे शिलेदार शंकरराव भोरे गुरुजी तथा अण्णा यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनाने मनाला प्रचंड वेदना झाल्या. त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो.     अण्णांचा जन्म 1933 चा. त्यांचे वडील तमाशा कलावंत होते. त्याच कलेचा प्रभाव आणि संस्कार अण्णांच्यावर होता तो त्यांच्या लेखनातून प्रतिबिंबितही झाला. स्वातंत्र्यपूर्व काळातील मातंग समाजाची स्थिती किती हलाखीची  असेल याची कल्पनाच केलेली बरी! पण त्याही काळात अण्णा शिकले. शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटलं होतं. त्यांचा पिंड कलावंताचा तसाच कार्यकर्त्याचा आहे शिक्षणाशिवाय मातंग समाजाला तरुण उपाय नाही हे त्यावेळी ओळखणारा हा माणूस! स्वतः शिकलेच पण असंख्य विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम अण्णांनी केलं. सातवी पास झाल्यानंतर ते शिक्षक झाले आणि एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला. कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी करत असताना त्यांना असंख्य अडचणी आल्या.जातीचे चटकेही बसले परंतु शांतपणे अण्णांनी आपलं काम सुरूच ठेव...