*माणसाच्या मुक्तीसाठी लढणारा महापुरुष- स्वामी विवेकानंद*
*माणसाच्या मुक्तीसाठी लढणारा महापुरुष- स्वामी विवेकानंद* प्रस्थापित भारतीय समाजव्यवस्थेला हादरे देणारा आणि भारताला आधुनिक बनविण्यासाठी संघर्षरत असणारा महापुरुष म्हणून स्वामी विवेकानंदांकडे पहावे लागते. परंतु स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा गाभा समजून न घेता त्यांना एका विशिष्ट धर्माशी जोडून ठेवणे हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखेच आहे. स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माच्या अंगाने जरुर मांडणी केली असली तरी त्यांचा धर्मविषयक दृष्टिकोन हा निश्चितपणे पारंपरिक पद्धतीचा नव्हता. धर्माच्या पलिकडे जाऊन खर्या अर्थाने माणसाचा सन्मान करणारा असा विचार त्यांच्या जीवनाचा गाभा होता, असे दिसून येते. ख्रिश्चन, इस्लाम आणि बौद्ध धर्म परंपरेतील माणसाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी स्वीकारून खऱ्या अर्थाने एक निखळ मानव्याचा विचार प्रस्थापित करणे, रुजवणे हेच विवेकानंदांचे ध्येय होते. त्यांनी केलेली भाषणे आणि त्यांनी मांडलेले विचार आपण सूक्ष्मपणे तपासून घेतले तर स्वामी विवेकानंद हे भारताला कशाप्रकारे बदलवू पाहत होते, हे नीटपणे लक्षात येते.त्यांचे वडील विश्वनाथ बाबू हे कोलकत्यातील एक नामांकित ...