अण्णा,डोक्यात अंधार असला की,बाहेरचा उजेड कसा दिसणार?
*अण्णा, डोक्यात अंधार असला की, बाहेरचा उजेड कसा दिसणार?* अण्णा हजारे नावाच्या व्यक्तीने मंदिरे उघडण्याची सरकारकडे मागणी केली आहे, असे वृत्त माझ्या वाचनात आले.प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहेच.पण धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी असेही म्हटले आहे की ,मंदिर उघडली पाहिजेत आणि त्यासाठी मी आंदोलन करणार आहे. शाळा उघडण्याची काही गरज नाही कारण शाळेत जाऊन तसेही शिक्षक काय उजेड पाडतात? असा अण्णांनी प्रश्न केला आहे. या वाक्याचा मी भारतीय नागरिक म्हणून तीव्र निषेध करतो. कारण अण्णा हजारे यांच्यासारख्या माध्यमांनी मोठ्या केलेल्या एका माणसाने असे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे निषेधार्ह आहे. त्याचबरोबर शिक्षकांवर अविश्वास दाखवणारे आहे. शिक्षकांचा अवमान करणारे आहे. खरंतर अण्णा हजारे यांच्या भूमिकांबद्दल आणि त्या भूमिकांमधील दुटप्पीपणाबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. गेल्या वीस पंचवीस वर्षाचा त्यांचा इतिहास जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर अण्णा हजारे हे किती दुटप्पी, ढोंगी आहेत ,हे आपल्या ल...